एखाद्याच्या भाषेवरून विनोदनिर्मितीसाठी त्याची टिंगल करणे हे शिष्टसंमत आहे. त्यांत त्याची निंदा नालस्ती अभिप्रेत नसते. मराठी नाटकांतून कन्नड भाषकांच्या मराठी बोलण्याची टिंगल विनोद निर्माण करते मद्रासींच्या हेल काढून बोलण्याचीही अशी टिंगल होतच असते. फार काय दोन मराठी कुटुंबे एकमेकांच्या भाषेची नक्कलवजा कुचेष्टा करतच असतात. असे करणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. यांत एकाद्या भाषकसमूहाने रागावयाचे कारण नाही.
इथे जया काय बोलली ते निंद्य आहेच, पण त्यानंतर ती ज्या प्रकारे कुत्सित हसली आहे ते अत्यंत गर्हणीय आहे. यावरून ती अनवधाने किंवा चुकून बोलली नसून मुद्दाम हेतुपुरस्सर बोलली आहे हे स्पष्ट आहे. त्यानंतर प्रियंका चोप्राने जे गडगडाटी रावणहास्य केले आहे त्याबद्दल कुणीच का लिहिले नाही हे समजत नाही.
अमिताभने ब्लॉगवर माफी मागणे, किंवा जया बहादुरी(की भागुबाई?)ने एखाद्या वर्तमानपत्राकडे जरतरची भाषा वापरून माफीनामा पाठवणे हे कुणालाही मान्य होण्यासारखे नाही.
ह्यांना आणि पोलीस आयुक्त प्रसाद यांना छातीठोकपणे सांगायला पाहिजे की मुंबई तुमच्या नाही तर आमच्या बापाची आहे!--SMR