आपल्याकडे एक पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा आहे, की जो कोणी चांगले समाजकार्य करायला लागला की 'तो राजकारण करतोय' अशी त्याला एक शिवी हासडायची आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. राजच्या बाबतीत असेच होते आहे. राजला मराठीचे प्रेम नाही असे म्हणणे म्हणजे डोळे उघडे ठेवून आंधळ्याची बतावणी करण्यासारखे आहे. एखाद्याने संततिनियमनाचा प्रचार केला तरी त्याच्याकडे राजकारण म्हणून लोक पाहतातच.

राज हा वाट चुकलेला पोरगा आहे त्याला महाराष्ट्र सरकारने आवरावे  अशी मागणी दिलीश्वर काँग्रेसवासी करत आहेत. शिवाजीच्या बाबतीत आदिलशहा आणि औरंगजेबाने अशीच मागणी शहाजीकडे केली होती, त्याचा काय परिणाम झाला ते सर्वश्रुतच आहे.  आजपर्यंत कुणालाही जे जमले नाही ते करून दाखवण्याची हिंमत या घटकेला फक्त राज ठाकरेमध्ये आहे हे ओळखून त्याच्यावर उगाच खोटीनाटी टीका करून स्वतःला फसवू नये. --SMR