के एल प्रसाद यांच्याबाबत राज ठाकरे यांचे विधान हे अशा स्वरुपाचे आहेः

"के एल प्रसाद हे पोलीस दलातील जया बच्चन आहेत. मुंबई कोणाच्या बापाची आहे अशा प्रकारचे विधान करण्याची काय गरज आहे? हिम्मत असेल तर वर्दी, पट्टा आणि बंदूक उतरवून समोर या मग तुम्हाला कळेल मुंबई कोणाच्या बापाची आहे ते. पोलीस दलामध्ये सर्वेक्षण करून बघा, स्वतः पोलीस सांगतील मुंबई कोणाच्या बापाची आहे ते. या प्रसाद महाशयांनी काही दिवसांपूर्वी 'आमचे हात पाय तोडून ठेवू' अशा प्रकारची धमकी दिली होती. एका आयएएस केडरच्या अधिकाऱ्याच्या तोंडी ही भाषा शोभते का? का अजून वातावरण बिघडवत आहेत. कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडवणारी विधाने करू नयेत एवढेही कळत नाही का?
मी महाराष्ट्र सरकारकडे तक्रार करत आहे की अशी बेताल विधाने करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला त्यांनी समज द्यावी "

हे संपूर्ण विधान पाहता. निदान त्या वक्तव्यात काही वावगे वाटत नाही.

मी राज ठाकरे यांचा समर्थक नाही. किंबहुना त्यांच्या आंदोलनाचे स्वरुप पाहता त्या आंदोलनाची संस्कृती निश्चितच मराठी नाही हे लगेच कळते. मात्र आंदोलनामागची भूमिका ही मला पटण्याजोगी आहे.