आपण (म्हणजे आपण सर्वांनी) असे करावे, विचारांची, शब्दांची झिम्मड उठवत आपापसातच चर्चा करत राहाव्यात. आता हा जो भय्यांच्या अरेरावीचा प्रश्न आहे, त्याबद्दल भय्ये हे मूळ महाराष्ट्रातीलच, इथपासून चर्चाप्रस्ताव मांडावेत, व काही नियतकालिकांतून जोरदार चर्चासत्र चालवावे. अधूनच मराठी संस्कृती हीच कशी भुक्कड होती आणि आहे, ह्यावरही चर्चा चालवाव्यात. भय्ये घरात घुसले तरी हे थांबवू नये. त्यांनाही चर्चेत सामिल करून घ्यावे. ते बहुधा जुमानणार नाहीत, आणि त्यांनी तसे केले की आपण 'हय्या हो' म्हणून कवितेच्या लडी सोडायला मोकळे!!
सध्यपरिस्थितीत दुसऱ्या कुठच्याही नेत्याने, समाजसुधारकाने काय केले असते म्हणजे ते अस्सल विचारवंतांना सांगता येईल काय? घराला आग लागली आहे, तेव्हा त्याचा तात्काळ काही इलाज करणार का 'हॅ, हे सगळे अगदी निरूपयोगी आहे, असे केले म्हणजे काय होईल' असे म्हणत राहणार?