>>जाळू, फोडू, हुसकावून लावू हीच -तीही शिवसेनेकडून उधार आणलेली भाषा बोलणारे <<

जया बच्चन उप्रवाली आहे; ती मराठी कार्यक्रम ऐकत नाही; ती राजला ओळखत नाही; अशा परिस्थितीत तिला कुठल्या भाषेत समजवायचे?  जाळू, फोडू ही भाषा तिला नाही, पण अमिताभला बरोबर समजली. आणि भाषा उधार घेतली असे का म्हणावे?  वारसाहक्काने कायमची मिळाली असे का म्हणू नये? ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत बोलणे चूक आहे?

इथे जया काय बोलली यापेक्षा ती कसे बोलली हे महत्त्वाचे आहे. बोलल्यानंतर तिचे कुत्सित हसणे आणि प्रियंकाचे त्यावर गडगडाटी हास्य याची दखल इतक्या लाखो मराठी माणसांपैकी फक्त राजनेच घेतली, आणि नंतर तमाम मराठी वृत्तपत्रसृष्टीने त्याला पाठिंबा दिला, ही गोष्ट काय सुचवते?

प्रसाददेखील नको ते बोलले आहेत, यावर त्यांना दुसरे जया बच्चन म्हणण्यात काही चूक झालेली नाही.  यापुढे नको त्या ठिकाणी नको तसले बोलणाऱ्या माणसाला जया बच्चन म्हणणे मराठीत रूढ झाल्यास आश्चर्य वाटू नये.