आमच्या गावी गणपतीला अख्खे हरभरे भाजून, मग जात्यावर आधी त्यांची साले काढून, मग ते दळून घेतात आणि त्या पिठाच्या वरिल प्रमाणे करंज्या करतात. ओले/सुके कुठलेच खोबरे घालत नाहित. इतक्या सुंदर लागतात.... आहा.. गावाहून आलेल्या अजून आहेत थोड्या शिल्लक. रोज एक एक पुरवून खातेय..
इथे बेसनाच्या करून पाहिल्या पण ती चव नाही.. आता वरिलप्रमाणे करून पाहिन.