मी एकदा एका सच्च्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव त्यांच्या एका बैठकीला गेले. नेहेमी प्रमाणे वादविवाद चालू होते,  विषय सावित्रीबाई फुल्यांचा आला.  त्यातला एकजण ब्राह्मण द्वेषावर घसरला. त्याने हिरीरीने आपला मुद्दा मांडता मांडता तो गाडगे महाराजांवर बोलायला लागला.  सोबत ब्राह्मण द्वेषाची चटणी 
होतीच आणि बोलता बोलता तो एकदम म्हणाला,  गाडगे महाराजांचे कार्य समजण्यासाठी गो.  नी. दांडेकरांचे पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचलेच पाहिजे.  गो.  नी.  दांडेकर म्हणाला आणि त्याने जीभच चावली.  
स्वत:च्या बोलण्यातील विसंगती त्याला स्वत:लाच लक्षात आली.  पण नाइलाज होता.  दुसऱ्या कोणा लेखकाचे 
नाव सुचेना.  

आजही परळच्या दामोदर सभागृहावरून जाताना हे सगळे आठवते.