तुमचा लेख विचार करायला लावणारा आहे. सुंदर

गाडी स्टेशन सोडते व थोड्याच वेळात प्रत्येक स्टेशननंतर आपण एका तुडूंब भरलेल्या डब्यातले एक असतो. दोन हात वर... शरीर आठही बाजुने एखाद्या रवीसारखे घुसळत असते. आपण गुदमरत असतो... गर्दी वाढत असते... इतर कोणत्याही वैयक्तिक बाबीसाठी जागा नसते. नुस्ती वाट पाहत राहायची.

मग कुठेतरी एक लोंढा येतो व आपल्याला बाहेर फेकतो. आपल्याला तिथे उतरायचं नसते. मग पुन्हा त्याच गाडीसाठी आटापिटा.

मी मुंबईत होतो तेव्हा माझ्याआधी काही वर्ष मुंबईत सेटल झालेले माझे मित्र मला हे मुंबईचे वर्क कल्चर आहे असे सांगत.