संस्कृतात जोडाक्षरे आल्यास पहिल्या अक्षरावर जोर देण्याचा नियम असतो. (नेहमीचे उदाहरण म्हणजे 'दिव्याने' हा शब्द. येथे जेव्हा 'दिव्य' अपेक्षित असते तेव्हा 'व्'वर जोर असतो पण ज्यावेळी 'दिवा' अपेक्षित असतो त्यावेळी 'व्'वर असा जोर दिला जात नाही.) पण 'सूर्य' ह्या शब्दाचा प्रचलित उच्चार त्या नियमाप्रमाणे नाही असे वाटते. त्या नियमाला काही अपवाद आहेत का?

- चैत रे चैत.