लग्न झाल्यावरही अशा प्रकारचे प्रेम करत जोडीदाराला फसविणे याच्यासारखा अक्षम्य गुन्हा दुसरा नाही. अशा लोकांनी पहिले लग्न सोडून दुसरे केले तरी त्याना अजून कोणी परत आवडणार नाही कशावरून?
कायद्याने एकामागून एक लग्ने करायला बंदी घातलेली नाही. एकावेळी अनेक लग्ने नको इतकाच कायदा आहे. कोणी कुणाशी केव्हा आणि किती वेळा लग्ने करावी हा व्यक्तिगत भाग आहे. व्यक्तिस्वातंत्र्य दोघांनाही आहे. अमेरिके सारख्या प्रगत देशाकडे पाहा एकाची कितीतरी लग्ने होऊ शकतात. आणि नंतर कुणी कुणाला शत्रू मानत नाहीत. हा माझा एक्स. हा माझ्या एक्सचा नवरा अशी ओळख समाजमान्य आहेत.
आता एका ठिकाणी राहून विचार करण्यापेक्षा ग्लोबल विचारसरणी आत्मसात करायला हवी, असे मला वाटते.