मी मराठी अनुष्टुभाचंच लक्षण सांगितलं आहे. संस्कृतात माझ्या माहितीप्रमाणे 'श्लोक' हे/हा एक वृत्त/छंद आहे आणि स्मरणशक्तीला थोडा ताण दिल्यावर लक्षणाची अशी ओळ आठवते: -
श्लोके षष्ठं गुरुज्ञेयम्।
सर्वत्र लघुपञ्चमम्।
द्विश्चतुष्पादयोः ह्रस्वम्।
सप्तमं दीर्घमन्ययोः।
श्लोकातील (प्रत्येक चरणातील आठ अक्षरांपैकी) सहावं अक्षर नेहमी गुरू, पाचवं अक्षर नेहमी लघू असावं. तसंच सातवं अक्षर दुसऱ्या आणि चौथ्या चरणांत ऱ्हस्व आणि बाकीच्या (पहिल्या आणि तिसऱ्या) चरणांत दीर्घ असावं.
त्यामुळे जर ही रचना श्लोकात किंवा संस्कृत अनुष्टुभात बसत नसेल तर तिला सरळ 'सुभाषित' म्हणूयात. सुभाषिताला कोणत्याही वृत्तात/छंदात बांधायची गरज मला वाटत नाही. (अर्थात वृत्तबद्ध/छंदोबद्ध रचनेला माझा बिल्कुल विरोध नाही! स्वतःला न जमणाऱ्या गोष्टी करण्याची गरज न वाटणे हे, मला वाटतं, स्वाभाविक आहे. ) ते गेय असेल तरी खूप. गेय गोष्टी चटकन पाठ होतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात. (सुभाषितं पाठ करणारे किती आणि त्यातील आशय लक्षात घेऊन उपदेश आचरणात आणणारे किती ह्या विषयावर न बोलणं उत्तम!)
- चैत रे चैत.