त्याचे सध्याचे संगीत जरा बाजूला ठेवले, तर तुम्ही आठवून बघा की "तेरे नाम" चे संगीत अगदी सुमधूर आणि छान होते. ते हिमेश रेशमियानेच दिलेले होते. सलमान-काजोलचा "प्यार कीया तो डरना क्या" ला सुद्धा त्याचेच संगीत आहे. (नक्की आठवत नाही....) संगीतकार म्हणून तो ठीक आहे. त्याच्या गायनाबद्दल काही बोलू शकत नाही. आणि अभिनयाबद्दल .....?!?

अरे ?!! पण, त्याला परग्रहवासी का घेवून जात आहेत ते कळले नाही? इंडीया टि. व्ही. चा तो कार्यक्रम मी पाहिला नाही. माहिती नव्हते त्या कार्यक्रमाबद्दल! त्या कार्यक्रमात कारणे काय दिली होती त्याला परग्रहावर घेवून जाण्याची? चर्चा प्रस्ताविकाने ते जर सांगितले तर चर्चेला आणखी मजा येईल.  

त्याचा 'अभिनयाने' सजलेला  चित्रपट 'कर्ज' आज रिलिज होतोय म्हणून पब्लिसिटी साठी स्टंट असू शकेल का हा? काय माहिती?