प्रश्न आहे तो "तत्त्व म्हणून काय स्वीकारायचं? "
प्रत्येक बाबतीत काही "तत्त्व" असलंच पाहिजे का? कुणा स्त्री-पुरुषाला एकमेकांबद्दल प्रेम वाटलं तर त्यात गैर काय? केवळ त्यांचं आधीच लग्न झालंय म्हणूनच फक्त आधीच्याच पत्नीबद्दल किंवा पतीबद्दलच आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम सारं बाळगणं आवश्यक आहे का? दुसरं म्हणजे प्रेम ही काही वाटून संपणारी गोष्ट आहे का? की एका बद्दल प्रेम वाटल्यामुळे दुसऱ्यासाठी काही शिल्लकच राहू नये?
मला असं वाटतं की बऱ्याच वेळेस आपण निखळ प्रेम आणि विवाहबाह्य शारिरीक संबंध यात गल्लत करतो. विवाहबाह्य शारिरीक संबंध असावेत किंवा नाही याबाबतीत काहीतरी तत्त्व जरुर स्वीकारावं, पण निखळ प्रेमाबाबत काही तत्त्व असण्याची गरज नाही, असं मला तरी वाटतं.