आवडत्या जोडीदाराबरोबर लग्न होउन सुद्धा परत एकदा कुणावर तरी प्रेम बसणे ही काय भानगड आहे या बाबतीत घेतलेला जनमनसाचा आढावा
<<टीन-एजर्स कदाचित कंक वगैरेमुळे भारावून जात असतील पण बाकीच्यांचे काय? >>
आजचे टीन-एजर्स भारावून जाण्याचा धोका मोठा आहे कारण तेच उद्याचे सक्षम (? ) नागरिक असणार आहेत
<<<जर सर्व पुरूष एकपत्नी, एकवचनी असावेत अशी अपेक्षा असेल तर ते शक्य नाही. प्रत्येकाच्या स्वभावात फरक असतो. माझ्या माहितीची काही जोडपी लग्नानंतर काही काळाने विभक्त झाली आहेत. तर आणखी काही पटत नसतानाही विभक्त व्हायचे नाही या कारणास्तव आपले आणि जोडिदाराचे आयुष्य असह्य करत आहेत. यात कुठला पर्याय चांगला?>>>
दोघांचे ही पटत नसेल तर विभक्त झाल्यास दोघानाही प्रश्न नसावा. परंतू दोघामध्ये एकाचे बाहेर प्रेम जमले तर त्याने त्याला हवे तसे वागावे का? यात उरलेल्याचा आणि मुलांचा काय दोष? एकदा लग्न, मुले झाले की प्रथम जाबाबदारी मुलांकडे , संसाराकडे पाहवयाची नसावी का? जेंव्हा वाटेल तेंव्हा प्रेम करावयाचे असेल तर मग लग्न करून कोणाशी तरी बांधीलकी ठेवावीच कशाला?
<<नवरा दारू पिऊन, मारहाण करत असेल तरी वटसावित्रीला सात जन्म(! )हाच म्हसोबा मिळू दे अशी प्रार्थना योग्य आहे का?>
अर्थातच नाही.. पण गंमत ही की अशा थरातल्या बायका मात्र आवर्जून सात जन्मासाठी "ह्योच दादला" ची प्रार्थना करतात
<<तेव्हा करण जोहरचे चित्रपट (बघायचेच असले) तर बघा आणि सोडून द्या. >>
अगदी खरंय.. वरील चित्रपटांची नावे केवळ उदाहरणादखल दिलेली होती.