मोहितेंना बाजूला घेऊन ते म्हणाले, "अहो, काय करताय? घड्याळ म्हणजे 'राष्ट्रवादी'चं चिन्ह आहे! जळगाव महापालिका निवडणुकीवरून सुरेशदादा जैन आणि राष्ट्रवादीचं भांडण लागलंय. राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय आपल्याला विधान परिषदेत जाता येणार नाहीये. ते आणखी भडकतील असं काही करू नका! "
काँग्रेससाठी राष्ट्रवादी सहनही होता येत नाही आणि सांगताही येत नाही अश्या जागचे दुखणे होऊन
बसले आहे. सिंगुर वाद पेटल्यावर मु. देशमुख आणि टाटा ह्यांची बोलणी ऐन भरात आली असतानाच
राष्ट्रवादीचे सुनील तटकरे ज्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असतात तिथे सेझवर सार्वमत घेतले जावे
हा योगायोग समजावा काय? चाणक्याचा राजकारणाचा पहिला नियम असतो, मित्रांना डोईजड होऊ
द्यायचे नाही कारण आजचा मित्र तो उद्याचा शत्रू असतो. जो शरद पवारांनी नीट पाळला. न्यानो
प्रकल्प गुजरातला मिळावा ह्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केला.