शिसारी नव्हे, हताशपणा. वैज्ञानिक/शास्त्रज्ञ मंडळींचा संबंध आहे म्हणून.

सत्यसाईबाबा नामक व्यक्तीच्या पाया पडणारे पंतप्रधान (सध्याचे नव्हेत!), गृहमंत्री, मुख्यमंत्री आपण विनातक्रार स्वीकारलेच आहेत. कॉर्पोरेट जगतातले मोहरे त्यांत नसतील असे वाटत होते. पण कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पान क्र ४ वरील बातमी Karva Chauth over economy (श्री चक्रधर१, दुवा देऊन दुवा घ्याल का?) वाचून प्रबोधन झाले. जागतिक मंदीच्या अरिष्टाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कसा कमीत कमी करता येईल यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी काउन्सिल ओन ट्रेड अँड इंडस्ट्री नेमली. त्यातील प्रमुख मंडळी - दीपक पारेख, राहुल बजाज, रतन टाटा, मुकेश अंबानी, सुनील मित्तल, केशव महिंद्रा आणि सुनील मुंजाल. या मंडळींची एक बैठक १७ ऑक्टोबरला होती. पण 'करवा चौथ' हा जास्ती महत्त्वाचा प्रसंग असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आता पंतप्रधानांना पुढचा वेळ (परदेश दौऱ्यांमुळे) थेट आठवड्यानेच असल्याने ती आठवडाभर पुढे गेली.

हताशपणा या आणि अशा बोकाळत चाललेल्या अवैज्ञानिक दृष्टीकोनाबद्दल आहे. वैज्ञानिकांनीही अवैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायला हरकत नाही असे वाटत असेल तर प्रश्नच मिटला. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा यासाठी जिवाचे रान करणारे सावरकर त्यांच्या काळाला पेलले नाहीत. आणि आजचा काळही त्यांचा स्वीकार करायला तयार नाही.

अमिताभ बच्चन यांच्या आजारपणाचा (आणि तदनुषंगिक घडामोडींचा) संबंध या विषयाशी नाही, त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही.