अशीच जाळपोळ लुटालूट चालू ठेवा. नुसत्या मुंबईतच नाही तर सबंध भारतात. त्याशिवाय डोळ्यावर कातडे व कानात बोळे घातलेल्या स्वतःला विचारवंत समजणाऱ्या आंधळ्या मराठी लोकांना आणि उत्तर भारतीयांना राजने उपस्थित केलेले मुद्दे समजणार नाहीत. जाळपोळीने फारतर आर्थिक नुकसान होईल. भावनिक आणि सांकृतिक नुकसानीपुढे याची काय मातब्बरी? झालेले नुकसान भरून काढायला लाखो मराठी उपाशी व बेकार तरुण तयार आहेत. या प्रकारे तरी त्यांना काम मिळू द्या. तेव्हा जाळपोळ चालू द्या, त्यामुळेच हा प्रश्न सुटणार आहे. तुमचे उपकार मराठी जनता पिढ्यान्पिढ्या विसरणार नाही.
यासाठी आजच्या सामनातले संपादकीय आजच्याआज वाचा. (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू साम्ना डॉट कॉम). दुवा देता येत नाही. कॉपी-पेस्ट केले तर फॉन्ट वेगळा असल्याने चिकटवलेला मजकूर अवाचनीय होतो.