तुमचा चर्चेचा प्रस्ताव खरंतर अतिशय वेधक आहे.  पण लिहायला बसल्यावर कळतं की तो तेवढाच अवघड सुद्धा आहे. कारण याचा थेट संबंध कुटील अर्थशास्त्राशी आहे! 

याबाबतीत एक दोन मुद्दे जे डोक्यात येतात ते असे. वस्तूची एकक किंमत (युनिट प्राईस) वस्तूविनिमयात ठरवणं खूप अवघड आहे.  त्यामुळे खूप मोठे मोठे घोटाळे विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यवहारात होऊ शकतील.  अगदी दोन राष्ट्र हमरीतुमरीवर येण्याइतपत हे घोटाळे मोठे असू शकतील.   दुसरी गोष्ट म्हणजे याने महागाईचा त्रास वाचणार नाही तर वेगळ्या म्हणजे साठेबाजीच्या स्वरूपात पुढे येईल.  तिसरी गोष्ट म्हंणजे बँकांचा चलन विनिमयाचा व्यवहार पूर्ण ठप्प होईल आणि त्याचाही आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठाच परिणाम होईल.