ऋचा मुळे आणि योगेश वैद्य यांच्याशी पूर्णपणे सहमत! दादोजी कोंडदेव शिवाजीचे गुरू नव्हते, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेसंबंधी घटना घडलीच नव्हती, ज्ञानेश्वर वयाच्या ८० व्या की ९०व्या वर्षी वारले, शंकराचार्यसुद्धा दीर्घायुषी होते, औरंगजेबाने एक राजकीय चाल म्हणून आग्र्याहून शिवाजीची कुणाला समजणार नाही अशा बेताने सुटका केली, वगैरे आवया लोक अधूनमधून उठवत असतात. त्यातलीच ही एक हूल. लक्ष देण्याचे काही कारण नाही. पत्रलेखकाला अनुल्लेखाने आणि अप्रतिसादाने मारावे.
सावरकरांविषयीचा आदर असल्या कुठल्याही फालतू गोष्टीमुळे कमी होईल अशी भीती बाळगू नये. पत्रामुळे अस्वस्थ होण्याचेही कारण नाही.