माझ्या बऱ्याच मित्रांच्या मते, राजचे हे सर्व "राज"कारण आहे. इतर कुठलाही मुद्दा उरला नाही म्हणून त्याने हा मुद्दा हाथी घेतला आहे.

पण, मला असे वाटते, काही का असेना, इतके दिवस सुस्त झोपलेले महाराष्ट्र सरकार या एका व्यक्तिच्या आरोळ्याने जागे झाले आहे आणि महाराष्ट्राच्या वतीने निदान विधान तरी करत आहेत. नाहितर "मराठी"विषयी हे लोक पुर्वी काही बोलल्याचे विषेश आठवत नाही.

मला फक्त राज ठाकरेला एकच विनंती करायची आहे..... त्याचा राग हा रिक्षावाले, ऑटोवाले यांपेक्षा अर्थकारण करणाऱ्या संपत्ती दडवलेल्यांवर उफाळून यावा. कारण, केंद्रापर्यंत त्या लोकांचे हात पोहोचतात आणि ते मग त्यांच्यानुसार महाराष्ट्राचा कारभार चालवतात.