आपल्यावर वेळ आली की माणूस काहीही निर्णय घेऊ शकतो
इथे त्याबद्दल कुणालाच शंका नाहीये आणि प्रस्तावातही सावरकरांच्या निर्णयाबद्दल शंका घेतलेली नाहीये. उलट दांडेकरांच्या पत्रात ही शंका घेतलीये म्हणूनच हा प्रस्ताव ठेवलाय.
आपल्या आयुष्यात ज्या गोष्टींनी काहीही फरक पडू शकत नाही त्यावर वाद घालणे अयोग्य आहे. यात 'अभिमान, देशप्रेम, ' वगैरे सर्व आले.
असं म्हटल्यानंतर सगळा प्रश्नच मिटला. (!!! )
ज्यांना या पत्रामुळे काही मनस्ताप झाला आहे त्यांनी आजवर सावरकरांच्या धर्तीवर स्वतः केलेले कार्य लिहून कळवावे.
सावरकरांच्या धर्तीवर स्वतः केलेल्या कार्यामुळेच मनस्ताप होण्याचा अधिकार मिळतो का? एखाद्या व्यक्तिबद्दल आदर असणे आणि एखाद्या व्यक्तिच्या एवढेच महान कार्य आपणही करू शकणे या दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. त्यांचा एकमेकांशी काय संबंध?