हा लेख लिहिताना एका मुलभूत गोष्टीचा विचार केलेला जाणवत नाही.
मनातील विचार हे संपूर्णपणे नैसर्गीक असतात. एखाद्या विवाहीत स्त्रीला किंवा पुरुषाला दुसरे कुणी आवडणे :
१. याचा अर्थ असा होतोच असे नाही की पहिला भागीदार नावडायला लागतो आणि
२. त्याच्यात त्या माणसाच्या विचारांवर त्याचे स्वतःचे संपूर्ण नियंत्रण असूच शकत नाही. कारण ती गोष्ट अत्यंत नैसर्गीक आहे. एका माणसाला दोन माणसे त्याच अर्थाने जरूर आवडू शकतात.
आता प्रश्न असा की ज्या समाजात आपण राहतो तेथील मान्य झालेली तत्त्वे काय आहेत अन कायदे काय आहेत?
तर मुळात ही तत्त्वे निर्माण होतात तेच मुळी समाजाची व्यवस्था ठीक राहावी म्हणुन. पण मानवाने कितीही ज्ञान पाजळले, कितीही गुरूंनी काहीही सांगीतले, कितीही संतांनी कानीकपाळी ओरडून समजावले तरीही सेक्स ही अशी गोष्ट आहे जी फक्त निसर्गाच्या तालावरच नाचते. तेथे तत्त्वे गुंडाळली जाणारच. तेव्हा त्यावर कुणाचेही काहीही नियंत्रण नाही. त्यात परत प्रतारणा कशाला म्हणायचे? एखादा परका हँडसम पुरुष एखाद्या विवाहीत स्त्रीला फक्त 'आकर्षक' वाटणे, तेही क्षणभरापुरता, ही मानसिक पातळीवरची प्रतारणा आहेच की. आजच्या जगात इतके शुद्ध राहणे शक्य नाही. कुणी कुणाला घरी सोडायला जाणे, हसताना टाळी देऊन हसणे, बोलणे, ओळख करून घेणे, जेवायला जाणे अशा कितीतरी प्रसंगात अशा शक्यता निर्माण होऊ शकतात.
तेव्हा हा पूर्णपणे ज्याच्या त्याच्या स्वभावाचा प्रश्न असून तोही निसर्गाने नियंत्रित केलेला आहे.
त्यावर मते घेऊन अथवा देऊन परिस्थितीमध्ये फरक पडणार नाही.