रायगडासाठी मुंबई डेपोतून रात्री १२ ला एस्टी बस सुटते आणि सकाळी ७ ला पायथ्याशी 
पोहोचते.  ही सोय खास शनिवार-रविवार रायगड दर्शन करणाऱ्यांसाठी आहे.  रज्जू-मार्ग 
होण्यापूर्वी आम्ही एकदा रायगडावर गेलो होतो.  

एस्टी स्थानकावर १०. ३० लाच जाऊन पोहोचलो.  तोबा गर्दी होती.  आम्ही उभ्या उभ्या पत्ते खेळलो.  
एस्टी मात्र बिनचूक १२. ०० ला सुटली.

आमच्या बरोबर बरेच नवशे-गवशे होते.  त्यातील एकीचा धापा टाकत रायगडाचे जिने चढल्यावर 
निरागस प्रश्न, "शिवाजी महाराज तो बरस में १-२ बार ही आते होंगे ना?  इतना चढके आना आसान 
नहीं है ।" काय बोलणार?  

मग नवशे-गवशे मंडळींनी भरभक्कम पैसे देऊन एक स्थानिक मार्गदर्शक केला.  आम्ही मनांत म्हटले, चला एका मराठी माणसाला रोजगार मिळाला.  मग त्या मार्गदर्शकाला बाजूला घेऊन सांगितले 
की आम्हाला काहीतरी विशेष दाखव.  त्याने आम्हाला टकमक टोकाखालून जाणारी चोरवाट दाखवली.  
त्या वाटेने जाताना त्याने दाखवले की गडावरच्या लोकांना आम्ही जात आहोत हे कळत ही नाही.  इतक्या 
गर्द झाडीतून ही चोरवाट जाते.  

येताना भरपूर भाकऱ्या आणि लसणाची चटणी बनवून घेतली.  छानच चव होती त्यांची.

एकूण रायगड यात्रा मस्त झाली.