दहशतवाद हा चुकीचाच मार्ग आहे. त्या मार्गाने गेल्यामुळे पाकिस्तानचे व भारतातील मुसलमानांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हिंदुंनी हा मार्ग कधीच स्वीकारू नये. कारण दुसऱ्याचा द्वेष वा नुकसान करून कोणाची प्रगती होत नाही.
आज मुठभर अतिरेक्यांच्या आततायी कृत्यांमुळे संपूर्ण मुस्लिम समाजाला त्याची शिक्षा भोगावी लागत आहे. भारतातील बहुसंख्य मुसलमान हे शांतताप्रेमी आहेत, पण आता सर्वांकडेच संशयाने पाहिल्यावर त्यांची कोंडी होत आहे.

सूडाने पेटल्यावर काय होते हे महाभारतात चांगल्या तऱ्हेने दाखवले आहे. आपण सर्वच भारतीयांनी त्यापासून बोध घ्यायला हवा. सरकार न्याय देत नसेल तर सरकार बदला, कायदा हातात घेऊ नका.