कौंतेय, तुम्ही सर्व बाजूंचा साकल्याने विचार न करता आपले मत व्यक्त केले आहे. भारतातील विविध लोकांचा काही बाबतीत निरुपाय असतो. उदाः
राजकारणी : राजकारणी लोकांनी सर्वांना समान वागणूक द्यावी, आणि गुन्हा कोणी केला आहे हे न पाहता शासन/चौकशी करावी असे तुमचे म्हणणे आहे. परंतु ते जर सत्तेत राहिले तरच असे करू शकतील, नाहीका? आणि सत्तेत राहण्यासाठी त्यांना अहिंदूंना दुखवून चालणार नाही. हिंदूंना खूश केले तर ते पुन्हा निवडून देतील याची काय हमी? राजकारण्यांना समजून घ्या.
प्रसार माध्यमे : प्रसार माध्यमांना आपला व्यवसाय चालवायचा आहे. तसेच भारताची या जगातील प्रतिमाही जपायची आहे. त्यामुळे त्यादृष्टीने ज्या बातम्या देणे आवश्यक त्या दिल्या पाहिजेत (क्वचित प्रसंगी न घडलेल्याही). ज्या बातम्या लपवणे आवश्यक त्या लपविल्या पाहिजेत. प्रसार माध्यमांना समजून घ्या.
बुद्धिवादी : या गटातील व्यक्तींना आपण बुद्धीवादी आहोत, सर्वधर्म समभावी आहोत अशी आपली प्रतिमा जपावी लागते. चुकून हिंदूच्या बाजूने किंवा अहिंदूच्या विरुद्ध लिहिले तर विटाळ होईल ना! बुद्धीवादींना समजून घ्या.
राहता राहिले सामान्य जन. तुमच्या आमच्या सारखे. अहो, ही वरील मंडळी आपली काळजी घ्यायला बसलेली असताना, आपण ती कशाला करायची?
सप्रेम,
मन्दार.