श्रावण,
एका अभ्यासपूर्ण लेखाबद्दल प्रथम तुमचे अभिनंदन.....
आणि आता काही शंका -
तुम्ही म्हणत आहात की 'या हल्ल्यासंबंधात हल्लेखोरांचे राजकीय उद्दिष्ट असेल ते काश्मीरशी संबंधित.' हे असू शकेलच. परंतु दहशतवादाची जगतिक व्याप्ती बघता भारतात होणारे हल्ले हे त्या एका जागतिक दहशतवादी उद्दिष्टाशी निगडीत नसतील का? काश्मीर संदर्भात एक वेगळा, काश्मीर केंद्रित दहशतवादी 'अप्रोच' विविध संघटनांचा आहेच. मग मुंबई हल्ल्यांमागचे प्रयोजन काय? मला पडलेला अजून एक प्रश्न - मला असे वाटते की कुठलीही बंडखोर संघटना आपले हेतू स्पष्ट करत असते. जसे की नक्षलवादी सरंजामशाही शोषणाविरुद्ध बंड करतात, एलटीटीई वेगळया तमिळ स्टेटकरता युद्ध करते. परंतु ही मंडळी त्या विवक्षित भागात कार्यरत असतात. ज्या दहशतवादाबद्दल आपण बोलत आहोत तो असा विशिष्ट हेतू स्पष्ट का करीत नाही? (काश्मीरमध्ये करत असेल, पण इतर ठिकाणचे काय?)
मुंबईवरील हल्ला, भारताच्या विविध शहरांमधील बाँबस्फोट, अमेरिकेवरील हल्ला, ब्रिटनमधील बॉंबस्फोट या सगळयामागे राजकीय हेतू असलाच तर तो इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांच्या धार्मिक हेतूने प्रभावित झालेला आहे असे तुम्हांला वाटते का? मला ही शक्यता खूप दाट आहे असे वाटते.
राजकीय रंग असलेले हे 'धर्मयुद्ध' आहे का?