हिंदीच काय पण कोणतीही भाषा ही भारताची राष्ट्रभाषा असण्याची तरतूद घटनेत नाही.

परंतु भारतात बहुसंख्य लोक हिंदी जाणतात आणि बोलू शकतात.

मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषा तोडक्या मोडक्या येत असल्या किंवा त्यावर मातृभाषेचा प्रभाव पडत असला तर त्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. सरळ मराठीत बोलावं ना. प्रसारमाध्यमवाले बघून घेतील काय करायचं ते.

पाटील, पवार, देशमुख यांची हिंदीत बोलण्यासाठीची तडफड बघितली की किव वाटते त्यांची आणि राज्याची देखिल की जिथे मुख्यमंत्र्याना देखिल मराठीत बोलायची लाज वाटते.. मराठीत एखादी पत्रकार परिषद सुरू केली तरी उत्तरेतल्या वाहिन्यांवाले हिंदी हिंदी म्हणून  बोलू देत नाहीत. जे स्वःताच्या भाषेबद्दल ईतके बेफिकिर असतील त्यांच्या  कडून राज्याच्या रक्षणाची अपेक्षा करणे चुकिचे आहे. अश्याच एका दुर्दैवी घटनेच्या वेळेला बंगलोर च्या आयुक्तांनी कानडीतून माहिती दिली आणि ती सर्वांनी आपापल्या भाषातून दाखविली.

याबाबत म्हादू यांच्याशी सहमत.

शेवटी वैतागाने असे म्हणावेसे वाटते की स्वाहिलीत बोललात तरी चालेल पण स्पष्ट, संयमित आणि प्रसंगाला अनुरूप असे बोला!

याबाबत हॅम्लेट यांच्याशी सहमत.

आर आर पाटील ह्यांनी हिंदी कच्चे असल्याने चुकीचे शब्द वापरले असे मला नाही वाटत. त्यांच्या बोलण्याचा आशय मराठीत कसा होता ते नाहीच कळले मग कसे काय ठरवणार की चुकीच्या हिंदीमुळे  ते झाले. दुसऱ्या दिवशीही लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी ह्यांनी राजीनामे दिले नव्हते,  मी का देऊ?  ह्यात ही हिंदी आणि मराठी ने जास्त फरक पडत नाही.

याबाबत देवदत्त यांच्याशी सहमत.