२०२०२०पूर्वी बारा बलुतेदारांच्या काळात हीच पद्धत वापरली जायची.
अर्थात त्याकाळी इतक्या वस्तू मुळातच निर्माण झालेल्या नव्हत्या त्यामुळे गरजादेखील कमी असायच्या त्यामुळं अदलाबदल जास्त प्रमाणात किंबहुना जास्त वस्तू अदलाबदल करता येत होत्या.
आता ही पद्धत वापरू गेल्यास अडचणी येण्याची शक्यता आहे.
सगळ्याच वस्तू आता पैशात मोजल्या जात असल्यामुळे,असं म्हणता येईल :
एक किलो तांदूळ हा एक किलो तांदूळ न राहता तो "२० रुपये" झालाय.गहूदेखील एक किलो गहू न राहता "२५ रुपये" झालाय.
त्यामुळे, तुमच्या उदाहरणाचा जर विचार केला तर, देणारा एक किलो तांदळाची किंमत आणि एक किलो गव्हाची किंमत यात तुलना करणार आणि मगच परवडत असेल तर व्यवहार करणार आणि हेच साधारण सर्व वस्तूंच्या बाबतीत होऊ शकते.मग ती वस्तू अदलाबदल करण्याजोगी असो अगर नसो.म्हणून असे म्हणता येईल की अदलाबदलीचा व्यवहार यशस्वी होण्याकरिता त्या वस्तूंची किंमत एक असली पाहिजे.तरीही एक अडचण राहतेच.
समजा, मला जर एक किलो येशेल(गोडेतेल/शेंगतेल) हवे असेल तर मला किमान तीन-साडेतीन किलो तांदूळ द्यावा लागेल. आता प्रश्न असा आहे की हा तांदूळ कुठून आणायचा? की तोही अदलाबदलीतूनच? त्यासाठी काय द्यायचे? ते देण्यासाठी आपल्याकडे ते असले पाहिजे? अशी ही शृंखलाच होईल!
पूर्वी हे शक्य असण्याचे कारण म्हणजे बहुतेक कुटुंबांचा प्रमुख व्यवसाय शेती हा होता त्यामुळे त्यांना " कुठून व काय" हा प्रश्न पडत नव्हता. ते "उत्पादक" होते. आपण उत्पादक नाही आहोत. त्यामुळे कुठंतरी पैसा हा येतोच भले ती वस्तू अदलाबदलीने घेता येण्यासारखी असो अगर नसो.
पण जिथं असं अदलाबदल करणं शक्य आहे तिथं करायला काहीच हरकत नाही. पण वाढत्या शहरीकरणामुळं हे तरी शक्य आहे की नाही कुणास ठाऊक? पूर्वीसारख्या चाळ, किंवा वाडा संस्कृती ( संस्कृती असणं महत्त्वाचं आहे वाडा अगर चाळ असो अगर नसो!)जिथं अजून आहेत तिथं हे शक्य आहे.
....................... कृष्णकुमार द. जोशी