तिच्यासारख्या कित्येक अनिता, सुनिता रात्रंदिवस काबाडकष्ट करत राहतात, त्यांच्या पोराबाळांना भरवण्यासाठी. काही दुखलं खुपलं तर आपलं आपणच घरच्या घरी औषधपाणी करतात आणि पुन्हा कामाला जुंपून घेतात. का तर काम केलं नाही तर पोरं खाणार काय? आणि मग एक दिवस कुपोषणानं, एखाद्या जर्जर रोगानं सडून मरून जातात. आणि त्यांची पोरं? त्यांचंही तेच होतं. मिळेल ते शिळं पाकं, घाणेरडं खाऊन ही पोरं मोठी होतात आणि तसंच परत कष्ट करकरून करकरून मरून जातात. गेली शेकडो वर्षं हेच चाललंय. कुत्र्याचं जिणं सुद्धा या लोकांएवढं घाणेरडं नसतं. सतत काम, सतत हाल अपेष्टा, सतत दडपण - का तर भाकरीच्या एका तुकड्यासाठी... एखादा डोंगराचा कडा अंगावर कोसळावा तसं लहानपणापासूनच या लोकांवर काम असं कोसळतं की त्याखाली हे लोक भरडून जातात. स्वतःला विसरतात. आपण माणूस आहोत हे विसरतात. स्वतःबद्दलचा विचार, आपल्या आवडींचा विचार, मानसिक जडण घडण, स्वतःची अध्यात्मिक उन्नती या गोष्टी यांच्या गावीही नसतात. कसली आलीये अध्यात्मिक उन्नती?
अक्षर न अक्षर विचार करण्याजोग. खरे तर चेकॉव्ह ने किती पूर्वी लिहिलेल आहे हे. पण भारतात अद्याप कित्येक ठिकाणी असेच आहे
शेवटही न विसरता येण्याजोगा.
फार सुंदर लिहिलीत तुम्ही ही कथा. वातावरण आणि घटना अगदी मिसळून गेल्यात.
अतिश्य चांगले लेखन वाचल्याचे समाधान मिळाले.