सुरेश भटांनी मात्र गझलेची वाट सोडली नाही. (ही ओळ' विक्रमादित्याने आपला हट्ट... 'च्या चालीवर म्हणावी. ) त्यांनी 'नाही म्हणावयाला आता असे करूया' असं म्हणत माणसांपासून गांडुळापंर्यंत सर्वांना शेरांच्या तोंडी दिलं! (शेरांचा गांडुळाशी आलेला हा एकमेव संबंध. ) त्यांनी लिहिलेली गझलेची बाराखडी वाचून पुढे अनेकांना 'ग'ची बाधा झाली. हे सगळे गझलकार मग भटांच्याच ओसरीवर पथारी पसरून 'मराठी गझल भोंदूंच्या विळख्यात', 'गजले'तला 'ज' झगड्यातला की जबड्यातला? ' असे वाद घालू लागले. ('गज्जल' असाही एक शब्द पूर्वी प्रचलित होता. आम्हांला तो बरोबर वाटतो. कारण 'मराठीत तीन अक्षरी शब्दांत मधले अक्षर 'ज' आले असता जोडाक्षर होते. ' पाहा- हुज्जत, इज्जत, इ. )

मस्त चाललय हो चालूदे चालूदे