तीनही भाग आजच वाचले. कथा आवडली. विसुनाना म्हणतात त्याप्रमाणे चेकॉव्हच्या कथेला मराठमोळा साज एवढा उत्तम चढवला आहे, की अनुवाद वाटूच नये.
कथेचा शेवट मात्र काही खास वाटला नाही. की मलाच समजला नाही? म्हणजे काहीतरी सनसनाटी, काहीतरी ट्विस्ट वगैरे असा काही हा शेवट आहे का? म्हणजे शेवटामध्ये अध्यात्मिक उन्नती होण्याचा संबंध काही मला कळाला नाही.