अहो जोशीसाहेब,पोह्यांना हे नाव मी नाही दिले. आम्ही गेल्या वर्षी ६वी ते ९वी च्या मुलांचे शिबीर घेतले होते.
तेव्हा मुलांना या पोह्यांचे सर्व साहित्य देऊन व सर्व पदार्थ कच्चेच वापरून एक पदार्थ बनवा, अशी स्पर्धा घेतली
होती. खूप छान प्रतिसाद दिला मुलांनी. इतर सर्व साहित्य वापरता आलं, पण मोड आलेल्या कच्च्या मुगांचे काय
करायचे, असा प्रश्न पडला त्यांना. मग आम्ही केलेले पोहे त्यांना खायला दिले, तेव्हां त्या पोह्यातील रंगसंगती
पाहून मुलांनी 'इंद्रधनुष्य पोहे' असे नामकरण केले. तोपर्यंत मी आपली या पोह्यांना 'निसर्गोपचार पोहे'म्हणत
होते. कारण निसर्गोपचाराच्या कोर्समध्येच कच्च्या खाण्याचे महत्त्व मला कळले होते ना!