बच्चन कुटुंबशी माझं काहीही सोयरसूतक नाहीं. मला त्यांच्याबद्दल काही विशेष आदरही वाटत नाहीं. ज्या प्रमाणे आपण सर्व पोटापायी राबतो
त्याच प्रमाणे हे देखिल कष्टकरी माणसं. फरक तर फक्त कष्टाची व कमाईची मात्रा. ज्या समारंभाचा ऊल्लेख केला आहे, त्यात जयाबाईंचे चिरंजीव व आणखीन एका गृहस्थाने इंग्रजी मद्धे वक्तव्य केलं. त्या नंतर, जेव्हा जयाबाईंची पाळी आली, तेव्हा त्यांनी आप्ल्या चिरंजीवांकडे पाहत म्हटलं " हम तो यूपीवाले हैं, हम तो हिंदी में बोलेंगे". ह्यात कुठं मराठी भाषेचा किंवा मराठ्यांचा अपमान ! जर का कुणाला समोरच्या माणसात चूक काढाईचीच असेल तर काहीही सबब चालेल आणि कितीही चूका आढळतिल.
लक्ष लक्ष मराठ्यांच्या पैकी फक्त एकालाच ही गोष्ट खटकली ह्यात निदान मला तरी काही आश्चर्य वाटत नाही. नाहीतरी हिंदी चित्रपट व्यवसायातिल माणसं हिंदी मध्ये नाही तर कोंकणी मध्ये बोलणार का ? अमिताभ साहेबांच्या जालनिशी वर आपली नोंद करून नानासाहेबां प्रमाणे अटके पार झेंडा नेण्याचा अविर्भावही मला तरी आणता येणार नाहीं. बच्चन कुटुंबात्ल्या कुठल्याही सदस्याचा (सुनबाईं सकट) हल्लीचा चित्रपट बघण्याची मला इच्छा होत नाही. तरी देखिल अणोळखी बाईंना "थेरडी" म्हणून संबोधित करणे हेही काही सभ्यतेचे लक्षण वाटत नाही.
एकुण असे वाटते की राजनैतिक (कुठली नैतिकता) आणि अभिनेते (कुठले नेते) यज्ञाला बसले आहेत आणि आपण सर्व (मी सुद्धा) आप्ल्या वेळेची आणि रक्तदाबाची होमात आहुती देत आहोत.