लक्ष लक्ष मराठ्यांच्या पैकी फक्त एकालाच ही गोष्ट खटकली ह्यात निदान मला तरी काही आश्चर्य वाटत नाही.

ही गोष्ट एकालाच खटकली?  एकालाच म्हणजे फक्त मलाच तर नाही?

अंकलेसरियांनी तो कार्यक्रम पाहिला नसावा.  जया बच्चन नुसतेच बोलल्या नाहीत तर, त्यांनी त्यानंतर तोंड वाकडे करून कुत्सित हास्य केले आहे. यावर प्रियांका चोप्रा फिदीफिदी विकट हसल्या. हा प्रसंग तीन चार दिवस रोज दूरदर्शनच्या वाहिन्या दाखवत होत्या. या घटनेवर माझ्या माहितीचे दहाबाराजणतरी आठवडाभर चर्चा करीत होते.  त्या काळात जया बच्चनबद्दल अनेक वर्तमानपत्रांतून आणि अनेक अनुदिन्यांवर शेकड्यांनी निषेध करून झाले आहेत.

पण ही घटना फार जुनी झाली आहे, आत्ता उकरून काढायची गरज नव्हती.

यानंतर परवा परवा त्यांनी लोकसभेत अध्यक्षांकडे बोटे दाखवून, "चोर सोडून संन्याशाला सुळी" असे बोलून अध्यक्षांची सपाटून बोलणी खाली आहेत.  त्यांना कुठे आणि कसे बोलावे हे समजत नाही ही गोष्ट सत्य आहे.