संवेदना=शरीराला किंवा मनाला झालेली जाणीव. भान= मनाला किंवा शरीराला आलेली जाग. भास=मनाला जाणवलेली खरीखोटी संवेदना. व्यवधान=कामात घातलेले लक्ष. अवधान=लक्ष.
'जाणीव'चे अनेकवचन जाणिवा, 'व्यवधान'चे व्यवधाने, 'अवधान'चे अवधाने, 'संवेदना'चे संवेदना.. ज्ञान, जाण, भान आणि भास यांची अनेकवचने होत नाहीत. हे शब्द नेहमी एकवचनीच असतात.
उदाहरणेः त्याला आरोग्यशास्त्राचे ज्ञान आहे. त्याला स्वतःच्या आरोग्याची जाण आहे. बंद दरवाज्यामागे कोणी उभा आहे याची तिला जाणीव झाली. भास तर नसेल? तिला भीतीची संवेदना झाली. नोकरी करताना अनेक व्यवधाने सांभाळणाऱ्या तिचे प्रसंगावधान जागृत झाले.
अंगातल्या ओल्या कपड्याची त्याला जाणीव आहे पण त्याचे भान नाही. रोगी बेशुद्धावस्थेतून भानावर आला. वगैरे वगैरे.
त्यामुळे न्याय, नीती, अर्थ, धर्म यांचा अवधानांशी संबंध नाही. अवधान म्हणजे केवळ परिस्थितीकडे असलेले लक्ष. त्यामुळे दिशावधान, स्थलावधान, कालावधान, प्रसंगावधान(संकटावधान धरून) यांव्यतिरिक्त, वातावरणावधान(हवामानावधान), वयावधान(वयोमानावधान, स्व-आरोग्यावधान), सभावधान(लोकसमुदायावधान=गर्दीचे व्यवधान), आणि स्त्री-पुरुष-उपस्थिती-अवधान हीच खऱ्या अर्थाने अवधाने.
.