पुण्याहून मुंबईला जाणारी जी गाडी नेरळला थांबते ती घ्यावी. अथवा कर्जतला उतरून लोकलने वा वाहनाने नेरळ गाठावे. तेथूनच  टॉय ट्रेन सुटते. त्याचे रिझर्व्हेशन इंटरनेटवरही होते. खाजगी टैक्सीनेही जाता येते, पण शेवटचे ३ किमी. चालावे लागते.
बजेट मधे बसेल अशी बरीच हॉटेल्स् आहेत. सीझनमधे गर्दी जास्त असते. जोडून सुट्ट्या आलेल्या असताना अजिबात जाऊ नये. चालायची तयारी असेल तर ४ दिवसांत सर्व पॉईंटस् पाहून होतात. फक्त गार्बट पॉईंटला खराब रस्त्यामुळे नेत नाहीत.
पॅनोरमा, लुईझा, एको, वन् ट्री हिल, मंकी असे बरेच पॉईंट आहेत. रस्ते लाल धुळीने माखलेले असतात. वाहनांना परवानगी नाही.  सृष्टिसौंदर्याची आवड असेल तर उत्तम ठिकाण!