संतोषजींनी आधीच माहिती दिली आहे. परंतु अजून थोडी माहिती देत आहे.
उदाहरणादाखल सूर्याबद्दल लिहिले आहे. तेथे संतोषजी म्हणतात तसे परीक्षकाने 'व' हे अक्षर निषिद्ध केले की 'रवि' हा शब्द वापरता येणार नाही. परंततु ह्याचा अर्थ असा नव्हे की पंडिताने इतर पर्यायी शब्द योजावेत.
एकदा का 'र' हे अक्षर सांगितले की त्यात बदल करता येत नाही. आणि म्हणूनच 'निषिद्धाक्षरी' ही खरी कसोटी आहे.
येथे परीक्षक देखील श्लोकरचनेत तरबेज असलेली व्यक्ती असते. त्यामुळे पंडिताच्या डोक्यात नक्की कोणते शब्द असावेत याचा अंदाज घेऊन पुढचे कोणते अक्षर निषिद्ध केल्याने पंडित अडचणीत येईल हे पाहिले जाते. अर्थात, पंडित हाही काही कमी नसतो, तो आपल्या अपूर्व शब्दकौशल्याने श्लोक पूर्ण करतोच.
(अधिक माहितीसाठी वैदिक संशोधन मंडळ, टि. म. वि. किंवा वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे येथे संपर्क साधला जाऊ शकतो.)