मला असे वाटते --
स्त्रियांचे शिक्षण - शिकलेली आई मुलांचा अभ्यास घेई.
विधवा विवाह - विधुर पुनर विवाह करू शकतो - तर विधवा विवाहास विरोध का?
बाल विवाह बंद - बाल विवाहाचे दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत -- लहान मुलींना शिक्षणापासून वंचित, मातृत्व...
योग्य वयात लग्न होणे हेच योग्य.
सतीची प्रथा बंद - पतीच्या निधनानंतर पत्नीनेच का स्वतहाला जाळून मरून जावे? तर मग पत्नीच्या निधनानंतर पतीने ही सती जावे.
संततिनियमनासाठी साधने वापरणे - यात चूक काय?
नऊवारी ते पाचवारी - धोतर जाऊन प्यांंट आलीच की?
स्त्रियांनी सायकल चालवणे - स्त्रियांनी सायकल चालवली म्हणून आज स्त्री चंद्रावर हि जाऊ शकते.
या कारण मुळे संस्कृती बुडलेली नाही तर संस्कृतीमध्ये चांगले बदल झाले आहेत. जो हा बदल स्वीकारतो तो कालासोबत टिकून राहतो. जे बदल मानवजातीच्या कल्याणासाठी आहेत ते (बुरसटलेले विचार सोडून) स्वीकारायला काय हरकत आहे?