या पृथ्विवर, [अगदी पाण्यात सुद्धा] आग का लागते? विचारा अग्निशामकांना.....
फायर ट्रायांगल असे काहीसे ते लोक त्या घटकांना संबोधतात.
अनादी कालापासून अंता पर्यंत हेच घटक या पृथ्वीवर आग लावत आले, लावत आहेत व लावणारच.
आता मला सांगाच कोणीतरी, काय बदलले, बदलते वा बदलणार? " चेंज ईज ओनली कॉन्स्टंट" च्या पुरस्कर्त्यांनी इकडे अभिप्राय नोंदवावाच.
लेखकाने, सकारात्मक मानसिकतेने, लौकिकाची पर्वा न करता, योग्य प्रश्नच उपस्थित केले आहेत. यावरून लेखक खरंच आपला हितमीत्र आहे, हेच सिद्ध होते. प्रश्न, आपल्या हिताचेच आहेत.
ही चर्चा स्त्री, मुली, महिलावर्गाला फार फार उपयुक्त ठरावीच. उपरोक्त प्रतीसादांवरुन/ अभीप्रायांवरून त्या वर्गाने आपण " ठिणगी " व्हायलाच जन्माला आलो आहोत का? असा प्रश्न स्वतःशीच विचारावा. सकारात्मक विचार सतत करून आपापले 'मन' नियंत्रीत ठेवावेच आणि माझ्या या अभिप्रायावर भाष्य करण्याचे धाडस देखील दाखवावे.
सर्वांचे धन्यवाद.