षडरिपूंना समाविष्ट करुन, प्रमेयात्मक  सिद्धांत, व्याख्या, संकल्पना वा कसोट्या मांडाव्या आणि मग काळाच्या ओघात, [ हजारो वर्षांच्या अंतराने सुद्धा ] किती गोष्टी [उदा. गुन्हे ] व कोणकोणत्या गोष्टी   बदलतात  ते प्रयोगाअंती तपासावे.

तत्त्व हे स्थळ, काळ वा वेळ यावर अवलंबून नसतात.

उदा. या मर्त्य पृथ्वीवर, जर, जमीन, व जोरू हे , अनादी कालापासून, अंतापर्यंत गुन्ह्यांचे ' उद्दीष्ट" राहीले आहे, राहत आहे व राहणार आहे.

 या तीन घटकांमधे, जोरू हा  एकमेव सजीव 'घटक'. त्या घटकाने स्वतःहून " स्वेच्छा बळी " [ WILFUL VICTIM ]  होणे, "फक्त टाळणे" , एवढेच त्यांच्या / प्रत्येकाच्या हातात असते. आणि हेच या चर्चेच्या मुळ-लेखकाला मुख्यत्वे म्हणायचे आहेच.

[ प्रतीबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठच. हे देखील तत्त्वच, १०,२०,१००,२००,१०००,२०००,..... वर्षांपर्यंत सत्यच राहणार.]

विचारा श्री. भुषणजींना.

उदा. रासायनीक प्रक्रियेचे घेउया.

अ + ब = क ------- OK?

उपरोक्त प्रक्रिया या एका गृहीतकावर अवलंबून असतात. ते म्हणजे N.T.P. [ अंडर, नॉर्मल टेंपरेचर अँड प्रेशर ]

N.T.P.  हे MILIEU भोवतालचे वातावरण, प्रक्रिया,  सिद्ध करत असते. बाकी ही प्रक्रिया भारतात, अमेरीकेत, चीन मधे, रशियात सगळीकडे एकच परिणाम देते. [ "जर" NTP काँन्स्टंट ] . यात अ, ब, क च्या मुलद्रव्यात्मक व्याख्या, संकल्पना वा कसोट्या कधीच कोठेच बदलणार नाहीत.

सजीवांच्या एकत्रीकरणाच्या शास्त्रात [समाजशास्त्रात ] सुद्धा अशीच मुलद्रव्ये, प्रक्रिया, व्याख्या, संकल्पना, कसोट्या  असतीलच.

मग 'बदलते' काय? म्हणजे काय काय सापेक्ष?    ...... तर उपकरण व परीणामांचे स्वरूप वा अपवाद.

माझे वैयक्तीक मत, समाजशास्त्रींना विचारून किती खरे / खोटे ठरवावे.

सगळ्याचे साऽऽऽर ' तत्त्व'.