राजकारण सर्वव्यापी आहे. सामान्य माणूस या राजकारणापासून पूर्णतः अलग राहू शकत नाही. निदान पाच वर्षांनी (क्वचित त्यापेक्षा ही कमी कालावधीने) येणाऱ्या निवडणुकीच्या वेळी तरी नक्कीच नाही.
संतोषरावांनी प्रश्न उपस्थित केला आहे की मराठी, हिंदुत्व आणि निधर्मित्व यातील कशाला मराठी मतदारांनी (मतदार हा शब्द मी वाढवला आहे) प्राधान्य द्यावे?
वस्तुतः या तीनही गोष्टीमध्ये विरोध असण्याचे कारण नाही. माझे हिंदुत्व सांभाळून ही मी निधर्मी राहू शकतो. किंबहुना मुळातच हिदू एवढे सहिष्णू आहेत की त्यांना निधर्मी राजवटीबाबत वेगळे काही सांगायला नकोच! (येथे मी 'निधर्मी' शब्दाचा अर्थ सर्वधर्म समानत्व असा घेतला आहे. खरे पाहता, Secular शब्दाचा अर्थ इहवादी असा आहे. आणि त्या अर्थाने सर्व हिंदूंना 'निधर्मी बनवणे हे एक मोठे आव्हानच असेल. सावरकरांच्या शब्दात सांगायचे तर आज बहुसंख्य हिंदू देवलसी आहेत; त्यांना देशलसी बनवणे आवश्यक आहे.)चालू विषयापुरते, सर्वधर्मस-समानत्व मानू या.)
राहता राहिला मराठीचा मुद्दा! मराठी भाषेचे आणि भाषिकांचे हित मला महत्त्वाचे वाटणे स्वाभाविक आहे. पण त्याचा विचार ही मला अखिल भारतीय संदर्भातच करावा लागतो. प्रथम हित भारताचे, अन पाठोपाठ महाराष्ट्राचे! त्यात विरोधाभासाला जागा असू नये.
या पार्श्वभूमीवर ज्याला जो पक्ष योग्य वाटेल तो त्याने निवडावा. शेवटी 'उडदामाजी काळे-गोरे, काय निवडावे निवडणारे,' हे खरेच!
(थोडे शुद्ध लेखनाच्या संदर्भात- ईतर हा शब्द इतर लिहणे आवश्यक)