रवी, सातत्य या बाबतीत प्रथमेश आणि कार्तिकीपेक्षा आर्या उजवी होती असे आपल्याला वाटणे गैर नाही. सातत्य या गोष्टीचा विचार परीक्षकांनी केलेला असेलही. परंतु आर्याची गाणी सुद्धा मधल्या काळात चांगली होत नव्हती. जेव्हा शमिका आणि शाल्मली बाहेर पडल्या, तेव्हा आर्याही जाते की काय अशी भीती निर्माण होण्याइतपत तिचे सातत्य कमी झाले होते. अर्थात कार्तिकी तर बाद झालीही होती. पण मला वाटतं त्यानंतर ती खरंच कात टाकून आल्यासारखी गायली आणि जिंकली‌.

शिवाय आर्याचा आवाज खूप वरचा आणि गोड आहे. अशा आवाजाचा कालांतराने थोडा कंटाळा येतो. (मला तरी येतो) त्या आघाडीवर कार्तिकीने चांगलीच बाजी मारली होती. तीजनबाई, शमशाद बेगम, शोभा गुर्टू, अबीदा परवीन, आणि लंबी जुदाई गाणारी गायिका (नाव नेमकं आत्ता आठवत नाहीये, कोणाला आठवलं पटकन तर जरूर कळवा.) यांच्यासारखी स्वतंत्र बाजाच्या आवाजाची कार्तिकी स्पर्धेच्या शेवटच्या काळात अधिक यशस्वी झाली त्याचं एक कारण कदाचित हेही असू शकेल. असो. निकाल लागला आहे आणि त्यात बदल नाही. पण मुद्दा एवढाच की मला तरी निकाल सयुक्तिक वाटतो.