शुद्ध मराठी यांच्याशी मुद्दा म्हणून पूर्ण सहमत आहे. पण निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर या समन्वयवादी भूमिकेचा काडीचा उपयोग नाही.  कारण आपण शहाण्यासारखा विचार केला तर तोंडावर पडतो राजकारणात. "बाबा, तुमची बाजू कोणती ते सांगा, म्हणजे तुम्हाला आमच्याकडे कसं आणायचं ते आम्ही बघतो!" असा राजकारण्यांचा पवित्रा असतो.

मला वाटतं की मराठी हिंदुत्व किंवा निधर्मिता हे कास धरण्याचे मुद्देच असू शकत नाहीत. आणि मृदुला यांनी मांडलेले विकासकामांसारखे महत्त्वाचे मुद्दे कास धरण्यासाठी उपलब्धच नसतात. मग काय? मला कोणालाही मत द्यायचं नाही हा विकल्प मतदानात सुरू झाला आहे / होणार आहे असं बरंच ऐकीवात आहे. त्याची कास धरायलाच जास्त आवडेल.

(याचा अनुभव घेतलेला नाही आणि माहिती मिळवण्याचे कष्टसुद्धा हे खेदाने नमूद करते. त्यामुळे हा अस्प्ष्ट उल्लेख. जाणकारांनी महिती पुरवली तर आभारी राहीन. )