मृदुला यांचे म्हणणे एखाद्या आशयप्रधान लेखाकरिता एकदम योग्य आहे. त्याची काळजी घेईन असं अदिती यांनी खिलाडूपणे मान्य केलं हेही छान आहे.
पण मला वाटतं हा लेख मुळातच आशयप्रधान नसून लेखिकेच्या सहज सुचलेल्या विचारांचा स्वैर प्रवाह आहे आणि वाचकाच्या दृष्टीने वर्णनप्रधान आहे; मग त्यात अनेक उपमा आल्या तर त्यात नवल काही नाही. त्या खूप कल्पक आहेत आणि त्यानं लेखाला मजा आणली आहे.
अर्थात हे माझं मत झालं. प्रत्यक्ष अदिती, मृदुला किंवा इतर कोणीही वाचक यांना लेख वाचून जे वाटलं तेही तितकंच प्रामाणिक आणि योग्य आहे हेही खरंच. मुद्दा वादाचा नाही. पुन्हा एकदा सगळं वाचल्यावर नव्यानं काही म्हणावंसं वाटलं इतकंच.