गरीबीचे प्रदर्शन वगैरे मुद्दे तात्पुरते बाजूला ठेवले तरी एक चित्रपट म्हणून फारच सुमार वाटला. पटकथेत सुसूत्रता नाही. पात्रांच्या वागण्यात कार्यकारणभाव विशेषत्वाने दिसत नाही त्यामुळे व्यक्तिरेखा खोट्या वाटतात.
वास्तव दाखवल्याचा आव आहे पण वास्तवाचा नीट अभ्यास नाही. साधं उदाहरण देतो.
झोपडपट्टीत राहणारा ३-४ वर्षाचा कोणता मुलगा बंदिस्त संडासाचा वापर करतो? ज्या ठिकाणी सर्रास प्रौढ माणसेही उघड्यावर शौचास बसतात तिथे हा प्रसंग चुकीचा वाटतो आणि ओढुनताणून बीभत्सपणा आणलेला स्पष्ट दिसतो. अमिताभचे हेलिकॉप्टर झोपडपट्टीत कसे
उतरते? जमालच्या भावाला कोल्टने रिवॉल्वर बनवले हे कोण सांगतो? कॉलसेंटरमधील प्रसंगातून तेथे काम करणारे नेहमी ग्राहकाच्या शिव्या खातात असं अधोरेखित करण्याची गरज काय? जावेद शहर सोडून कोठे जातो आणि का? बरं शहर सोडून गेला म्हणावं तर लतिका मात्र टी. व्ही. वरील कार्यक्रम संपायच्या आत शहरात दाखल होते.
रहमानचे संगीत फार विशेष असे नाही वाटले. उलट त्याने ताल, रोजा आणि रंग दे बसंती या चित्रपटात जास्त चांगलं संगीत दिलं होतं असं वाटतं.
शेवटी एकच म्हणेन की स्लमडॉग मिलिअनेअर ला आठ ऑस्कर मिळत असतील तर निशिकांत कामतांच्या 'मुंबई मेरी जान' ला सोळा ऑस्कर मिळायला हवे होते.