सहमत आहे. चिंटू मोठा झाला तर त्याचे निरागस रुप, निष्पाप मन, हे दिसने कठीण आहे.

चिंटुत सर्व लोक आपले बालपण शोधतात, किंबहुना बघतात. ते प्रसंग, तो खट्याळपणा, मिष्किल स्वभाव, तो मैत्री भाव, समंजसप्णा, एखादा प्राणी पाळण्याचा हट्ट, ते रुसवे-फुगवे, आपल्या पेक्शा ताकतवान राजुशी टक्कर, चोरून जोशी काकुच्या बागेतले फळे खाणे (विशेषतः आंबे), मिनि ला चिडवणे, मित्राना मदत करणे, पाले भाजी बद्दल नाराजी असुनही आईच्या आग्रहा मुळे खाणे असे सांगावे तेवढे कमीच. मी इयत्ता ९वी त असताना चिंटू मालिका सुरू झाली, ते आज पर्यंत आवर्जून वाच्तोच, पुर्वी तर ते संग्रह देखिल करायचो! तेव्हा चिंटुची पुस्तके निघाली नव्हती.

आपण  जितकी धमाल लहानपणी करतो तेवढी परत कदी आयुश्यात करू शकत नाही. मला विचराल तर मला चिंटू व्हायला आवडेल.  कदाचित असा माणुस शोधुनही सापडणार नाही ज्याला बालपण पुनः नको असेल. म्हणुनच चिंटू लहांच राहावा ही अगदी मनाच्या तळातून इच्छा आहे.