छान. गझल आवडली. मात्र काही ओळी आहेत त्याहूनही अधिक चांगल्या करता आल्या असत्या असे वाटते.

पुन्हा कधी ओळ धुंदशी मी रचेन जाणे
पुन्हा तशी वेदना मला खेटलीच नाही

पुन्हा तशी पौर्णिमा कुठे व्हायला अताशा
पुन्हा तशी भावना तिने नेसलीच नाही

कटाक्ष, हासून बोलणे, भेटण्यास येणे
तुझ्यावरी चूक एकही शेकलीच नाही

उगाच आला उगाच गेला म्हणोत सारे
कशास सांगू सजा पुरी फेडलीच नाही?

शरीर नेताय शायरी ठेवताय मागे?
म्हणू नका की चिता तुझी पेटलीच नाही

 - वा वा. मस्त.