प्रतिसाद आला नाही तर वाचक अरसिक असा निष्कर्ष काढत नसून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका येतेय.
समीर,
ह्याला इंग्रजीत 'ऍडींग ईन्सल्ट टू इंजुऱी' व मराठीत 'मीठ चोळणे' म्हणतात! माझ्या प्रतिसादातील मतितार्थ समजून न घेता आपण पुन्हा एकदा तीच (उतावीळ निष्कर्ष काढण्याची )चूक करीत आहात.मी वाचकांकडून 'प्रतिसादाची अपेक्षा करणे योग्य आहे' हे मानतो पण 'प्रतिसाद द्याच' असा आग्रह (जवळजवळ बळजबरी)कां? अशा आग्रहातुनच'प्रतिसाद आला नाही तर वाचक अरसिक असा निष्कर्ष काढत नसून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका येतेय' असली अपमानजनक विधाने जन्माला येतात.ह्याचा अर्थ आपली कविता वाचणारे पण कुठल्याही कारणास्तव प्रतिसाद न देणारे वाचक अप्रामाणिक! वा!
मला तुमच्या काही विधानांची गंमत वाटते.
उदाः मी माझे मत अतिशय नैराश्यात असताना दिले हे स्पष्ट करतो.
मला सांगा, २७ तारखेला (शुक्र) प्रकाशित केलेल्या कवितेला रविवार पर्यंत प्रतिसाद आले नाहीत तर नैराश्य येतं? इथे वाचकांचा एखाद्या कवितेला इक्का-दुक्का व फारसा उत्साहवर्धक नसलेला प्रतिसाद तोही उशीरानेच येतो व त्याच वाचकांकडून पुढच्याच कवितेला भरभरून प्रतिसाद येऊन कौतुक होते. मग काय त्याच वाचकांबद्दल कधी चांगले मत तर प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणार?कवीने थंड किंवा शून्य प्रतिसाद व कौतुक दोन्ही सारखेच घेतले पाहिजेत. हा कवितालेखनाइतकाच काव्यप्रक्रियेचा व कवीच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे.
उदा:आता तुम्ही म्हणत आहात की आपल्या कवितेच्या गुणवत्तेत कमी आहे की नाही हे तपासावे, मला प्रश्न पडलाय की कसे तपासता येईल ते?
समजा मी 'ह्या कवितेत कवीला काय म्हणायचे आहे ते अजिबात कळत नाही' असा प्रतिसाद दिला असता तर मी तुमच्याच भाषेत 'कविता वाचणारा (खरेतर न समजणारा) रसिक' झालो असतो का? पण मग मी निदान "अप्रामाणिक"ह्या श्रेणीत गणला गेलो नसतो.असेच ना?
ह्या सर्व चर्चेत तुमची कविता आवडली ह्याबद्दल वाद नाही हे लक्ष्यात घ्यावे.वाद आहे तो उतावीळपणावर व "त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका येतेय' असल्या विधानांवर!
जयन्ता५२