वरील प्रतिसाद वाचता एकूण लक्षात येत की भाजपा ह्यांनी लालक्रुष्ण पेक्षा मोदींना पंतप्रधान पदी बसवण्याचा निर्णय घेतला असता तर बर झाल असत. पण मला नाही वाटत की ते आता शक्य आहे. त्यामुळे त्या वादात वेळ घालवण्याचा काही फायदा नाही.
नक्कीच काँग्रेस च्या वाटेला हा देश जावा हे पटत नाही. अस वाटतं की लालक्रुष्ण पंतप्रधान होण्याचे जितके तोटे आहेत, त्यापेक्षा जास्ती आहेत समजा हा देश पून्हा गांधी परिवाराच्या हवाले केला तर. आणि देशावर इतकी वाईट परिस्थिती नाही आली की फक्त एकाच परिवारा वर देश जिवंत राहील . क्रिकेट मंत्री [क्षमा असावी, कृषी मंत्री] शरद पवार ह्यांच्या बीसीसीआय च्या मिटींग इतक्या जास्ती होत्या की गेल्या ५ वर्षात एकाही जिवंत शेतकर्याशी बोलण्याचा योग नाही आला. लालूला तर 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द इतका आवडतो की काल शिरडीत त्यांनी 'साईबाबा एक धर्मनिरपेक्ष भगवान थे' हे बोलायला पण चुकले नाहीत. हो बाबा आता शिरडीतले मुसलमान पण तर वोट देतोच ना... मग!! प्रत्येक नेत्याबद्दल बोलाव ते कमीच. बर काँग्रेस ची जितकी तारीफ करावी ती कमीच. छान दिवस आले आहेत देशाला आज त्यांच्या प्रयत्नांनी.
आता ह्याबद्दल बोलाव की काय मूद्दे भाजपानी मांडले तर ते जिंकू शकतील.
१. महागाई
२. नक्षलवाद
३. बिहार सारख्या राज्याची वाढ
४. डिफेंस ला वाढ
५. शेतकर्यां ला सवलती
६. प्रत्येक राज्यात वीज
आजच्या सरकारने पैसे खाण्या व्यतीरिक्त काही केले असते, तर वरिल गोष्टी पण होत्या देशहिता बद्दल.
मला वाटत की काँग्रेस बद्दल लिहून किंवा वाचून वेळ घालवण्या पेक्षा आडवाणींना पंतप्रधान कसं बरवावे ह्या बद्दल जास्ती विचार केला पाहिजे.
शेवटी मला एक निरीक्षण खूप आवडले - "कॉन" हे "प्रो" च्या विरुद्ध असेल तर काँग्रेस ही प्रोग्रेसच्या विरोधात आहे [झक्कास विजय]!!