प्रिय समीर,

१. आपण जयंतासाहेबांना दिलेला प्रतिसाद अजिबात राग न धरता दिलात हे खरच कौतुस्कापद आहे.

२. जयंतासाहेबांनी दिलेला प्रतिसादही मला अतिशय प्रामाणिक व खरा वाटला, आवडला. एकदम मैत्रीपूर्ण प्रतिसाद!

आपल्या दोघांचाही आदर ठेवून मी माझी काही मते मांडत आहे.

१. कवी स्वतः केलेली कविता जाहीर करतो याचे कारण हेच नाही काय की त्याला ती इतरांनी वाचावी व 'आवडली' म्हणावी?

२. प्रतिसादांसाठी कविता करू नये हे मत मला मान्य आहे, पण प्रतिसाद महत्त्वाचे नसतील तर जाहीर कशाला करायची? आपली आपणही ठेवावी!

३. माझ्या कवितांना जर इथे प्रतिसाद आले नाहीत किंवा खूप कमी आले, तर मी इथे कविता देणे बंद करीन. कारण उगाच आपला अन इतरांचा वेळ कशाला घालवायचा?

४. कविता स्वसमाधानासाठी करतात हे मला मान्य आहे व समजतेही. पण जाहीर केली गेलेली कविता तशी धरू नये.

५. कवितांचे पुस्तक काढल्यास ते विकत घेणाऱ्याला कसे वाटले हे समजणे जरा अवघड आहे. पण वेबसाईटवर कविता प्रसिद्ध झाली की ती आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होते. त्यात आलेले प्रतिसाद सरळ सरळ दिसतात. अशा वेळी प्रतिसादांच्या संख्येवर एखाद्याचा 'कवी' म्हणून दर्जा ठरू शकतो. ( अर्थातच प्रतिसाद पॉझिटिव्ह असले तर अन वाचकाची कविता जोखण्याची क्षमता नसेल तर ) . याच कारणासाठी मी याआधीसुद्धा तसेच याही स्थळावर प्रत्येक रचनेला निदान प्रतिसाद तरी दिलेलाच आहे. लोकांनी कवी म्हणून ठरवलेला 'दर्जा' आवश्यक नाही अशीही काही कवींची भूमिका असेल. पण मला तरी तो महत्त्वाचा आहे. याचे कारण मी ती कविता मुळात जाहीरच यासाठी करत असतो की ती इतरांनाही आवडावी व त्यांना बरे वाटावे व मला महत्त्व मिळावे. याला आपण स्वार्थी म्हणू शकता. ( बाय द वे - 'या' कवीच्या रचनेला प्रतिसाद दिलाच पाहिजे अशी उर्मी काही कवींना निर्माण होते त्याची कारणे वैयक्तिक असावीत. )

उदाहरण - 'चुकले असावे' या गझलेवर या स्थळावर आलेल्या प्रतिसादावरून जयंतासाहेबांचा कवी म्हणून दर्जा ठरावा की अन्यत्र हा प्रश्न आहे.